दर वर्षी २६ जानेवारी.....
रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे
नवी दिल्ली येथे,
एक मोठे संचलन आयोजित केले जाते.
हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.
संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवानज्योती,
येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात.
भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात.
तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते.
राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते.
त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here