Wikipedia

Search results

Friday, 28 February 2014

Jiddi shrikant Jichkar

श्रीकांत जिचकार
एकच माणूस डॉक्टर होता,
तो वकिलही होता,
तो आयपीएस
अधिकारी
तसंच आयएएस अधिकारी होता.

याशिवाय
तो पत्रकारही होता.
इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार,
खासदार आणि मंत्रीही होता.

इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे""- श्रीकांत जिचकार""
होय.
"श्रीकांत जिचकार" यांचं नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

जिचकारांचा 2004 साली अपघाती मृत्यु झाला आहे.
याप्रकऱणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं
आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसान
भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे
श्रीकांत जिचकार होय.
अवघ्या 49 वर्षांचं जीवन, 42
विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदकं
असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.

आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम
असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच
पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.
जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये
एमबीबीएस आणि एमडी,
एलएलबी, एलएलएम, डीबीएम
आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे.

जिचकरांनी 10 विषयांत एम ए केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र,
अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी,
राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व,
मानसशास्त्र यांचा समावेश आहे.

जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट
ही पदवी मिळवली.
जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून
मिळवल्या आहेत.
श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित
व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.
या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने,
ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच
आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष
वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.

जिचकार यांनी 1978
साली यूपीएससीची पर
यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे
दोनच वर्षात म्हणजे 1980
साली त्यांनी आयएएसची पदवी खि
टाकली.
जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.
विधानसभेची निवडणूक
लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.

या बुद्धिवंताने वयाच्या 25 व्या वर्षी पहिली सार्वत्रिक
निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र
विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून
गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते.
जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले.
एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता.
यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली.
१९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली.
जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये
त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले.
त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम
केले.
सलाम या आवलीयास...


Wednesday, 12 February 2014

शिवराय कविता

वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ
असून चालत नाही
त्यासाठी अंगात शिवाचा अंश
असावा लागतो …
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ
वळवून चालत नाही
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद
असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत
किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ
असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम
न्हाय
त्यासाठी रक्ताचा अभिषेक
करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून
चालण न्हवे
त्यासाठी शत्रू सोडाच
त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं
लागतं..
आग्राहून सुटका..
आणि शास्तेखनाची फजिती..
अहो राजा होण्यासाठी
अफजाल्यासारख्या
पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व
यायला
माझ्या राजांसारख
रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे
असावं लागतं…

बाबासाहेब आम्बेडकर आणि मराठा

बाबासाहेब आंबेडकर
आणि मराठा समाज यांचे
जिव्हाळ्याचे नाते **
त्यातील काही निवडक गोष्टी.....
1:-
महाडच्या चवदार
तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर
जावून
शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले
आणि त्यांच्या सोबत
असलेल्या कार्यकर्त्यानी "जय
शिवरायच्या" घोषणा दिल्या.
बाबासाहेबांनी महाड
चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात
शिवरायांचे
दर्शन घेवून केली.
2:-
बेळगाव येथे शिवरायांच्या ३००
व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर उपस्थितहोते.
3:-
बाबासाहेब आंबेडकर पत्र
लिहतांना पत्राची सुरुवात
"जय शिवराय" लिहून करत होते.
महाराष्ट्र शासनाने
हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
4:-
ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे
शिवरायांचा राज्याभिषेक
ब्राम्हणांनी नाकारला होता.
तो मनुस्मृती हा ग्रंथ
बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून
शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.
5:-
बाबासाहेब आंबेडकर लहान
असतांना "कृष्णराव अर्जुन
केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र"
भेट दिले
होते.
या चरित्रामुळे
बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.
केळुस्कर गुरुजी जन्माने"मराठा" होते.
6:-
छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब
आंबेडकर
"बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर
शहरात
रथातून मिरवणूक काढून फुले
उधळली होती.
7:-
राजा सयाजीराव गायकवाड
यांनी बाबासाहेबांना परदेशात
शिक्षणासाठी सहाय्य
केले होते.
सयाजीराव गायकवाड जन्माने
मराठा होते.....
जय जिजाऊ...
जय शिवराय....
जय ज्योतीराव.....
जय शाहु महाराज......
जय अण्णाभाऊ........
जय भिमराय................

Tuesday, 11 February 2014

Father बाप

ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!

तो बाप असतो...
तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये पोरांना
टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
......................तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,
होस्टेल शोधतो स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...........................तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
.......................तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो

वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
कर............
आणि वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा..

तानाजी मालुसरे

आज लढला सिंह कोंढाणा किल्ल्यासाठी ४//२/१६७०
त्या दिवशी वारे बरेच वाहत होते. देवासामोरील वात
फरफरत तेवत होती, जिजाऊ आपल्या बिछान्यावर
पहुडलेल्या. शिवबा त्यांचे पाय रगडित होते .
जिजाऊंची नजर आपल्या खिडकीतून समोर गेली .
आणी त्या ताडकन उठून खिडकीजवळ
उभ्या ठाकल्या मागोमाग राजे होतेच " काय झाले आऊ
साहेब" "शिवबा, शिवबा मोघली ध्वज
मिरवणारा कोंडाणा आमच्या डोळ्यात खूप दिवस सलत
आहे शिवबा शिवबा राजेंना हुकुमच
भेटला होता आईची आज्ञा शिरसावंद्य
मानणारा राजा इतक्यात महालाचे पडदे बाजूला सारून
एक धिप्पाड देहाचा माणूस आईसाब, राजं करीत आत
आला. तो होता तान्हाजी मालुसरे.
आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन
तो आला होता. तान्हाजी आले त्यांनी आऊसाहेबांचे
पाय शिवले महाराजांना मुजरा करीत गळाभेट घेतली. "
राजं आपली पायधूळ झाडायची पोराला सुनं
ला आशीर्वाद द्याया यायचे राजं बरका आऊसाहेब" पण
दरवेळी तेजपुंज दिसणाऱ्या राजांच्या चेहऱ्याचे तेज
इतरवेळी सारखे नव्हतं. आणि तान्हाजीला हे लगेच
जाणवलं. अहो जाणवणारच की बालपनाचं मैतर त्ये. "राज
काय झालं सगळी खैरीयत तर हाय न्हव.मी आल्या पासून
बघतोय काय तरी लपवतायीसा ह्या तान्ह्या पासून" "
अरे काही नाही तान्या" "न्हाय कसं काय तरी हाय राजं
आई तुळजा भवानीची शपत तुम्हास्नी काय त्येबोला"
तान्ह्या आम्हीं कोंढाणा सर् करायला जाणार आहोत
"काय त्ये जमायचे न्हाय राजं कोंडण्यावर आन म्या कुठ
घरी अजाबात न्हाय म्या जातो अन् कोंडाणा घेऊन
येतो का आता आमच्या तलवारी वर तुमचा इस्वास न्हाय"
"तसं नाही तान्हाजी" "अररं तान्ह्या येडा का खुळा तू
घरी लगीन काढलंय, पै-पाहुण जमल्यात, अन्न रांदतय,
दारात मांडव पडलाय, निविद दाखवलाय, औतन पोचल्यात
अन् तू मोहिमेवर गेलास तर जग हसलं राजांवर
वरबापाला काय तर मोहिमेवर धाडलाय" "वा आईसाहेब
कोपऱ्यापातूर वगळ यैस्तोवर आम्हीं भात
आमटी वरपायची, नवीन शेलं पागोटं घालून मिरवायचं
नाचायचं अन् आमचं राजं कुठ तर मोहिमवर आईसाब जग
हसल आम्हास्नी श्यान घालल तोंडात"
"तान्ह्या आदी रायबाचं लगीन पार पाड"
"नाही राजआधी लगीन कोंडाण्याचं मग
माझ्या रायबाचं" राजे हे काय पोर ऐकणाऱ्यातल न्हाय
तुम्ही द्या याला मोहीम आणि भांडून मोहिमेचे विडे घेऊन
हा सिंह मोहिमेवर गेला गेला तो परत न येण्यासाठीचं.
पाचशे मावळे सोबत घेऊन ते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य
नवमी) रात्री राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य
गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन
पोचले. त्यांच्या लढाईचे सभासद बखरीतील वर्णन -
तानाजी मालुसरा हजारी मावळीयांचा होता. त्याने
कबुल केले किं, "कोंडाणा गड आपण घेतो." असें कबूल करून
वस्त्रें, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन
गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून
रात्रीं गडाच्या कड्यावरून चढविले. जैसे वानर चालून
जातात, त्याचप्रमाणे कड्यावर चालून गेले.
आणि कडा चढून, गडावर जाऊन, तेथून माळ लावून वरकड
लोक देखील तानाजी मालुसरा चढून, गडावर जाऊन, तेथून
माळ लावून वरकड लोक देखील तानाजी मालुसरा चढून
गडावरी तीनशे माणूस गेले. गडावरी उदेभान राजपूत होता.
त्यासी कळले की, गनिमाचे लोक आले. हि खबर कळून कुल
राजपूत कंबरकस्ता होऊन, हातीं तोडा बा घेऊन, हिलाल,
चंद्रज्योती लावून बाराशें माणूस तोफाची व तिरंदाज,
बरचीवाले, पटाईत, सु-या, आडहत्यारीढाला चढवून
चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी 'श्रीमहादेव!'
असेंस्मरण करून नीट फौजेवर राजपुतांचे चालून घेतले. मोठे
युद्ध एक प्रहर जालें पांचशे रजपूत ठार जालें. चाळीस
पन्नास मावले ठार जाले. उदेभान किल्लेदार
खासा त्यांशी व तानाजीमालुसरा सुभेदार यांशी गांठ
ओअडली. दोघे मोठे योद्धे त्यांशी व
तानाजी मालसुरा सुभेदार यांशी गांठ पडली.दोघे मोठे
योद्धे, महाशुर, एक एकावर पडले. वार करीत चालले.
तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास
आली नाहीं। मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल
करून, त्याजवरी वोढ घेऊन, दोघेमहारागास पेटले. मोठे
युद्ध केले. एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारे
पडले. दोघे ठार जाले. मग सूर्याजी मालसुरा,
तानाजीचा भाऊ, याने हिम्मत धरुन, कुल लोक सांवरुन,
उरले रजपूत मा रले. कित्येक रजपूत कडे उडोन पळोनमेले.
असें बाराशे माणूस मारिले. किल्ला काबीज केला.
आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली.
त्याचा उजेड राजीयांनी राजगडाहून पाहिला आणी बोलले
किं गड घेतला. फत्ते जाली! असें जाहले टो जासूद दुसरे
दिवशी वर्तमान घेऊन आला किं,
"तानाजी मालसुरा यांनी मोठें युद्ध केलें. उदेभान
किल्लेदार यास मारिलें आणि तानाजी मालसुराही पडला"
असें सांगितले. गड फत्ते केला असें सांगताच राजे म्हणूं
लागले किं, " एक गड घेतला, परंतु एक गड गेला!" असें
तानाजीसाठी बहुत कष्टी जाहले. पुढे गडावरी ठाणे
घातले. सूर्याजी मालसुरा भाऊ नावाजून
त्याचा सुभा त्यास सांगितला. धारकरी लोकांस बक्षिसे
सोन्याची कडी दिलीं.द्रव्य अपार दिलें. वस्त्रें जरी कुल
लोकांस दिलीं. ये जातीने प्रथम कोंडाणा घेतला.

Monday, 10 February 2014

संताजी घोरपडे

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे
(१६८९ ते १६९७) सरसेनापती होते.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर
मराठ्यांच्या स्वातंत्र्य
लढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे
हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत
मराठेशाहीत घेतले जाते.
या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ
(१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य
सेनेचा सामना केला, मुघल
सैनिकां मध्ये
संताजी आणि धनाजी यांची प्रंचड
दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल
छावण्यांवर हल्ले हे
यांच्या युद्धनीतीचा भाग होते.
अत्यंत नाजूक पडत्या काळात
मराठ्यांचे स्वराज्य नष्ट
होण्यापासून वाचवले व जसजसे
औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत
गेला तसतसे नंतर
धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे
धोरण अवलंबले. १७०७ मध्ये
औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य
भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात
आणला होता.
शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व
धनाजी यांनी वाचवले व पसरवले.
मराठ्यांनी १८ व्या शतकात
जवळपास संपूर्ण भारतावर
आपला दरारा निर्माण केला...
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

Saturday, 8 February 2014

हम ना होन्गे

क्या अंतर पड़ जाएगा,
क्या कमी हो जाएगी....
हम ना होंगे,
ये कोयल गीत फिर भी गाएगी......

रंगो का आंचल ओढ़े,
फूल फिर भी खिला करेंगे...
हम ना होंगे,
ये तितलियाँ इसी तरह मंडरांएगी.....

हर सांझ ढले अंबर,
तारक मणियों का थाल बनेगा....
हम ना होंगे,
भोर ऐसे ही किरनें नई फैलाएगी....

संसार यूँ ही गतिमान रहेगा,
किन्तु लगता है ..
हम ना होंगे, कीमत प्रेम की तब ही समझी जाएगी......

मराठाच...

वाघ तो वाघच..
भडकला तर आगच..
उगारली तर तलवारच..
घातला तर वर्मी वारच..
एक ललकारी..
नाचती तलवारी..
हातात मराठ्यांच्या..
रणांगनी पेटती मशाली दिवठ्यांच्या..
नडला कि तोडलाच..

भिडला कि फाडलाच..
झुंजतो आम्ही सैतानाशी अशी आमची हिंमत..
स्वराज्य उभ केलय ईतिहास घडवुन तिचआमची किंमत..

जय जिजाऊ..!! ..जय शिवराय..!!

Tuesday, 4 February 2014

राजे कविता

राजे...........

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर
त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये
ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे
घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर
बघा स्वत:लच फ़सवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख,
ते बघा नवे देशपांडे,
वतनदारीसाठी टपलेले आहेत
त्यांच्या आतली काळी माणसं
खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही
कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची
स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री
आपला माथा झुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर
इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचे"
म्हणण्याची
आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची
आज रायबाला किंमत नाही.
इतिहास राहिला नाही
जो तो सोईप्रमाणे
आज इतिहासाला वाकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला
लागले
परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे
हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे
सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची
बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा
बघा आपल्यालाच कसा चकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय,
इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा
बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या
तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल
उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून
कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश,
तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा
फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे
ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच,
ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय
जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद,मुरारबाजी,
नेताजी,हिरोजी आणि मदारी
आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची,
मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना,
खूप झाले सेनापती,
सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही,
आजच्या राजकारणाची
हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा
आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर
राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की,
पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर
आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की,
जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ
त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे,चूकुनही बघू नका
त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर
घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते
तरीही विचारतात,
हप्ता का थकवतो ?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका,
पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर
वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर
खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस
आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे,
तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे
बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची
समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा
जणू रांझ्याचा पाटील आहे.
लोकशाहीचा पाईक मी,

राजे, चला
मी तुम्हाला
तुमचा महाराष्ट्र दाखवतो..
चला ना राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
काय ते तुमचे मावळे होते
जे लढले रयते साठी
अन
काय ते विजयी सोहळे होते जे सजले राजमाते
साठी
पण
आज तुमचाच मावळा
दोन दोन गर्लफ्रेंड वागवतो
अन
कशी
पाण्याची तहाण बिअरवर भागवतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
घरी बाप आत्महत्या करुन मरतो
तरी
तुमचा मावळा दारु
मटनाच्या पार्टीसाठी झुरतो
राजकारण्यांची धुनी भांडी करतांना यांचा आत्मा तरी कुठं
दुखावतो
बघा राजे
तुमचा मावळा स्वाभिमानाच्या नावाखाली मान
झुकवतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार
आज कैक झाले
मावळे म्हणवतात आता त्यांचे चेले
त्यांचाही डोळा आता पक्षाचा झेंडा पाहुनच
सुखावतो
म्हणुन
सह्यांद्रीच्या कड्याकडे हिमालय डोळे वर करुन
रोखावतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
रयतेच्या मतासाठी दारात येऊन जे भिक
मागतात
तेच पुढची पाच वर्ष मग रयतेच्याच डोक्यावर
नाचतात
गाडी झाली बंगला झाला
तरी
त्यांना पैशाचा माज सोकावतो
ईथे
राजकारण्यांच्या कृपेने भ्रष्टाचार
कसा फोफावतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
विसरले परंपरा
अन
पराक्रमाची कुठे आता भाषा नाही
तुमच्या मावळ्यांना ईतिहासाची आता ती नशा नाही
वर्गनीच्या पैशाने एकदा मिरवणुन काढुन उगाच
फुशारकी मिरवतो
सह्यांद्रीच्या कड्यावर
फिरणारा आता पबमध्ये मस्ती जिरवतो
ला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो