वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ
असून चालत नाही
त्यासाठी अंगात शिवाचा अंश
असावा लागतो …
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ
वळवून चालत नाही
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद
असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत
किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ
असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम
न्हाय
त्यासाठी रक्ताचा अभिषेक
करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून
चालण न्हवे
त्यासाठी शत्रू सोडाच
त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं
लागतं..
आग्राहून सुटका..
आणि शास्तेखनाची फजिती..
अहो राजा होण्यासाठी
अफजाल्यासारख्या
पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व
यायला
माझ्या राजांसारख
रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे
असावं लागतं…
My blog for those, who want something different in marathi on internet..
Wikipedia
Search results
Wednesday, 12 February 2014
शिवराय कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here