Wikipedia

Search results

Monday, 10 February 2014

संताजी घोरपडे

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे
(१६८९ ते १६९७) सरसेनापती होते.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर
मराठ्यांच्या स्वातंत्र्य
लढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे
हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत
मराठेशाहीत घेतले जाते.
या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ
(१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य
सेनेचा सामना केला, मुघल
सैनिकां मध्ये
संताजी आणि धनाजी यांची प्रंचड
दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल
छावण्यांवर हल्ले हे
यांच्या युद्धनीतीचा भाग होते.
अत्यंत नाजूक पडत्या काळात
मराठ्यांचे स्वराज्य नष्ट
होण्यापासून वाचवले व जसजसे
औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत
गेला तसतसे नंतर
धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे
धोरण अवलंबले. १७०७ मध्ये
औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य
भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात
आणला होता.
शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व
धनाजी यांनी वाचवले व पसरवले.
मराठ्यांनी १८ व्या शतकात
जवळपास संपूर्ण भारतावर
आपला दरारा निर्माण केला...
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here